
पिशवी : शाहुवाडी तालुक्यांत मुसळधार पावसाने ऐकीकडे सोयाबीन,भुईमुग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर जोमांत असलेल्या रताळी पिकांत रान डुकरांनी हल्ला चढवला असुन कवळ्या रताळी पिकांचे वेल उखडून टाकल्याने ते पुर्णपणे खराब झाले असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
वन विभागाने रान डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे .गेल्या काही वर्षांत रताळी पिकांची शाहुवाडी तालुक्यांत मोठया प्रमाणात लागवड केली जात आहे तोडकी मशागत कमी कालखंडात नगदी पैसा देणार पिक म्हणून शेतकरी या पिकाकडे वळले आहेत त्यांत शाहुवाडी वातावरण व तांबडया मातीतील रताळास चांगले उत्पादन मिळत आहे व शहरी बाजार पेठांत चवदार रताळ म्हणून या रताळ्यांना चांगला भाव मिळत आहे त्यांमुळे भात व अन्य पारंपारिक पिका पेक्षा रताळी उत्पादनात मोठी वाढ झाली आहे पण अलीकडे या पिकांच्या मळ्याकडे रानडुकरांनी लक्ष्य केल जात आहे.
रानडुकरांच्या कळपांकडून मळेचेच्या मळे एका रात्रीत फस्त करून टाकले जात आहेत. रताळांचे वेल एकदा उकरुन टाकले की ते परत नापिक होतांत त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होते. त्यांत पावसाने हाहाकार माजवल्यांने रात्रीच्या वेळी राखण करणे जोखमीच झाले आहे. तरी त्वरित वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या पिकांचे भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गांतुन होत आहे.