
-पुणे : प्रभाग क्रमांक २६ समता भूमी -घोरपडे पेठ मधील अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी पाटोळे,अँड.भावना बोराटे,संजीवनी बालगुडे ,सईद सय्यद यांनी आपल्या प्रचाराची आजची सुरवात समता भूमी पासून करण्यात आली .ठिकठिकाणी छोटे व्यावसायिक ,महिला व युवक मोठ्या प्रमाणात स्वागत करताना दिसून येत होते .

रिक्षावाले व पथारी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे रवी पाटोळे यांनी यावेळी सांगितले .तसेच या वसाहतीतील नागरिकांचे विविध प्रश्न अतिशय काळजीपूर्वक सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले .समता भूमी या प्रभागातील नागरिक आणि महिलांनी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे अतिशय उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले .ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या घोषणा देताना कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसून येत होते .काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नागरिकांनी केला .






